Maharashtra budget 2025: राज्यातील सर्व नागरिकांसाठी घरे ! राज्यामध्ये नवीन गृह निर्माण धोरण लवकरच लागू होणार

Maharashtra budget 2025: सध्याला मार्च अधिवेशन महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. राज्यातील सर्व नागरिकांना घरे मिळणार हे उद्दिष्ट पुढील पाच वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. यामध्ये राज्य सरकार नवीन गृहनिर्माण धोरण याची घोषणा लवकरात केली जाणार आहे.

Maharashtra budget 2025: राज्यातील नवीन सरकारचे पहिले अधिवेशन सुरू

राज्यातील नवीन सरकार भरल्यानंतर राज्यातील पहिले अधिवेशन मार्क्समध्ये सुरू झाले आहे. यामध्ये कोणकोणते शासकीय निर्णय होऊ शकतो त्याची आशा लोकांना लागलेले आहे. तर नवी सरकार आता नागरिकांना काय देणार आहे? याची आतुरता सर्व नागरिकांना लागली आहे. राज्यातील अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील अर्थसंकल्प सादर करण्याचे वाचन सुरू केला आहे. यामध्ये साधारण लोकांना काय फायदा होणार आहे? हे देखील आपल्याला यामध्ये समजणार आहे.

हे ही वाचा ::  Namo Shetkari Yojana 6th Installment update: नमो शेतकरी योजना 6वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या

Maharashtra Budget 2025: राज्यात 44 लाख 77 हजार घरकुल मंजूर

आता राज्यातील नागरिकांना नवे घरे देण्यासाठी राज्यातील सरकारचा कोणते नवीन धोरण लागू करणार आहे. देखील या अर्थसंकल्पामध्ये सादर होणार आहे. राज्यातील सर्वसाधारण नागरिकांना सर्वांना घरे मिळणार हा उद्दिष्ट पुढील पाच वर्षांमध्ये साध्य करणार आहे. राज्यामधील नवीन गृह धोरण लवकरच जाहीर करणार आहे.

राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना, आणि पीएम सनमन योजना, शिबिर आवास, आदिम आवाज, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंत चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास, धर्मवीर आनंद दिघे आवास, या प्रकारच्या घरकुल योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहे. अंतर्गत आता एकूण 44 लाख 77 हजार इतके घरकुल मंजूर करण्यात आले आहे.

सर्व घरांच्या छतावरती सौर ऊर्जाचा संच मिळणार

केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारा पीएम आवास योजना ग्रामीण भागातील टप्पा – 2 या अंतर्गत 2024-25 राज्यात 20 लाख घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट यापैकी 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आले आहे.

केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारा पीएम आवास योजना ग्रामीण भागातील टप्पा – 2 या अंतर्गत 2024-25 राज्यात 20 लाख घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट यापैकी 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आले आहे.

त्याचबरोबर 14 लाख 71 हजार लाभार्थी पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांची वितरण करण्यात आले आहे. घरकुल योजना राबवण्यासाठी देशामधील प्रथम क्रमांकामध्ये महाराष्ट्र राज्य आहे.लोकप्रतिनिधी आणि मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकार या योजनेमध्ये 50 हजार रुपये वाढ करून देणार आहे. योजनेमध्ये घरांवरती सौरपॅनल सुद्धा बसवण्यात येणार आहे.

हे ही वाचा :: Free Pipeline Anudan Yojana 2025: फ्री पाईपलाईन अनुदान योजना सुरू, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? आणि कुठे करायचा जाणून घ्या सविस्तर

Maharashtra budget 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरात किती घरे मंजूर होणार?

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरी भागामध्ये साधारण किती घरे मंजूर होणार याविषयी सविस्तर माहिती आपण खाली बघणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरी टप्पा -१ चार लाख 42 हजार 748 घरे मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे तीन घराचे बांधकाम पूर्ण झाला आहे. बाकी असलेल्या घराची बांधकाम ह्या वर्षी 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरी टप्पा – २ पुढील पाच वर्षांमध्ये राज्यातील शहरांमध्ये पाच लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी 8 हजार 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येणार आहे.

चांगल्या क्वालिटीच्या भांड्यात येणार बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर करून, हरित रित्या बांधकाम करण्यात येणाऱ्या घरे, त्याचबरोबर घरावरती सौर पॅनल बसवण्यासाठी अधिक अनुदान देण्यात येणार आहे.

निष्कर्ष: सर्व गरीब कुटुंबातील व्यक्तींना घर मिळावे म्हणून केंद्र सरकारने पीएम आवास योजना सुरू केली आहे. देशामध्ये मध्ये 2024 चा अर्थसंकल्पामध्ये दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या वर्षाचा राज्य सरकार देखील या योजनेत मोठा सहभाग घेत आहे. मार्चमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पामध्ये शहरी भागामध्ये जास्तीत जास्त घर बांधण्याचं उद्देश असणार आहे.

Leave a Comment